Tuesday, May 5, 2009

आग लागो ह्या जगाला......

आग लागो ह्या जगाला
मग कोणीतरी य़ेईलच
पाणी घेऊन विझवायला
अहो असं नाही म्हणायचं
काहि पण बडबडता राव
असं नाहि लिहायचं.......

मग भुकंप होवो
धरणी नाचेल ता ता थैया
अहो काय पण बोलता राव
असं अभद्र नका बोलु भैय्या..
मग सुनामी येवो
अन् डुबून जावी सारी दुनिया...

अहो असं काय म्हणता सतिशराव
काही वेड तर नाही ना
लागलं तुम्हाला राव
मग असं होवो ह्या जगाची धुरा
भारतीय नेत्यांच्या हाती येवो
मग सांगा कोण वाचवेल ह्या दुनियेला

आता तर आम्ही
काय बोलावं राव
तुम्ही तर गडावरचा दोर कापला
अन् म्हणता मारा उड्या
तुम्ही पण ना राव......!

कवि - सतिश चौधरी

No comments:

Post a Comment