Thursday, May 7, 2009

आता वेगळा अपुला बंध...!

मज खंत वाटे अनंत
जीव लागे हा एकांत
ओसरुन सर गेली
मरुन गेलो मी जिवंत...

हसऱ्या नयनांची कधी
धुडवड रंगीत होती
त्याच ओल्या कडांवरती
आता अश्रुंचे लाट बेरंग...

इवल्याशा मुठ्ठीमध्ये
वेळ न कैद झाली
अनवानी पावलांची ही
परिक्षा सावलीपर्यंत...

एक निर्जन रस्ता हा
आगीत न्हाहलेला
खरच कुठतरी चुकलय
म्हणुन झाला प्रेमभंग...

पण कोण वळून पाहणार
मागे रस्ता विसरलेला
वाटा तुझ्या वेगळ्या
आता वेगळा अपुला बंध...



कवि - सतिश चौधरी

No comments:

Post a Comment