Tuesday, May 19, 2009

धावाधावा सरपंच माही बकरी हारवली...

काल कुपापाशी
चरत होती छान
म्या म्या गायची
सरस्वती गान
पन एकाएकी
झाली हो गायब
काय करु आता
माही बोलती बंद झाली
धावाधावा सरपंच
माही बकरी हारवली...

ऐरंड्याची तिले लई
आवड होती भारी
पोरिसारखी माह्या आंगनी
नाचत होती न्यारी
आता काय करु सरपंच
पिल्लं तिचे बोंबलत आहे
आमची माय कुठं गेली
म्हणुन मले इचारत आहे

जीव दाटुन येते
ह्या मुक्या जिवापायी
धुंडून आना माही बकरी
तिच्या पिल्ल्यांपायी
काय करु आता
माही बोलती बंद झाली
धावाधावा सरपंच
माही बकरी हारवली...


कवि - सतिश चौधरी

No comments:

Post a Comment