Saturday, May 2, 2009

काय राव तुम्ही ......! एका शेतकऱयाची व्यथा .......

काय राव तुम्ही
वांग्याच्या धंद्यात
भरपुर कमावलं ....
अन् मिरचिच्या नादान
सारं शेतच गमावलं…

होत्याचं नव्हतं पेरलं
आयऱ्यात पाणि धाडलं
ऊन्हाचा चटका बसुन फटका
टोम्याटो पिकवलं….
अन् बाजारा नेऊन
सारं फुकट सांडवलं…..

लागवड केली होती
गोबीच्या पिकासाठी
वणवण झाली होती
खतांच्या बोरींसाठी
उठसुठ फेकलं बुडाला टेकलं
संत्र्याले गमावलं....

काय राव तुम्ही
वांग्याच्या धंद्यात
भरपुर कमावलं ....
अन् मिरचिच्या नादान
सारं शेतच गमावलं….

कवि - सतिश चौधरी

No comments:

Post a Comment